Breaking News

राजकारण

“उद्धव ठाकरेंना घरात करमेना,जवळ बसायला लोकं नाहीत, म्हणून आठवले शेतकरी… “

विश्व भारत ऑनलाईन : मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत …

Read More »

जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली. मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

शिंदे गटातील मंत्री बेपत्ता, राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्यात आलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना गुलाबराव पाटील गायब झाल्याचे म्हटले आहे. जनतेने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

Read More »

खरगे अध्यक्ष, तरीही सोनिया गांधींकडेच रिमोट?

विश्व भारत ऑनलाईन : देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर बुधवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. …

Read More »

राहुल गांधी 382 किमी चालणार : महाराष्ट्रात 7 नोव्हेंबरपासून भारत जोडो यात्रा

विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधीची भारत जोडो पदयात्रा सात नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात येत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत ते नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलडाण्यात 382 किलोमीटर चालतील. त्यापैकी 208 किमी नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चालणार आहेत. गांधी सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूरला मुक्कामी असतील. 8 तारखेला पदयात्रा सुरू होईल. दुपारी ते अटकळी गावात भोजन करून शंकरनगरला मुक्काम करतील. 9 …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष : खर्गे की थरूर? आज निर्णय

विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार,याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे. याकडे साऱ्या …

Read More »

शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? पोलीस बदली प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचे कळते. रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि …

Read More »

सुनील केदार, राजेंद्र मुळक दगाबाज : वाचा कोणी केला आरोप?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी माजी मंत्री सुनील केदार हुकूमशाह आणि राजेंद्र मुळक दगाबाज असल्याचा आरोप रविभावन येथील पत्रकार परिषदेत केला. नेहमी आपल्या क्षेत्रातील सदस्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यासाठी केदार यांचे प्रयत्न असतात. मात्र, यावेळी आधी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही या दोन …

Read More »

भाजप चिंतेत?: नागपूर जिल्हा परिषदेवर सुनील केदारांचे वर्चस्व

विश्व भारत ऑनलाईन : सर्वांचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे या अध्यक्षपदी निवडून आल्या. भाजपलाही सुनील केदार यांचे वर्चस्व रोखण्यात यश आलेले नाही. परिणामी, भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. यातून सुनील केदारांची ग्रामीणमध्ये पकड किती मजबूत आहे याची प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून …

Read More »

पुन्हा नागपुरात गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांना धक्का, जिल्हा परिषदेत काँग्रेसने मारली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बाजी

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने गड कायम राखला आहे. काँग्रेसच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील मुक्ता कोकरड़े नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष (मत प्राप्त 39) आणि काँग्रेसच्याच गोधणी येथील कुंदा राउत (मत प्राप्त 38)यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. तर,भाजपच्या मदतीने उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांना केवळ 15 मत मिळाली. त्यामुळे भाजपच्या नियोजनाला …

Read More »