Breaking News

विश्व भारत

अधिकाऱ्यांना अधिकचे वेतन कशाला? : रेती, अन्य मार्गानी कमवितात कोटींची संपत्ती

ग्रेड पे निश्चितीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत‎ कामबंद आंदोलन सुरू केले आहे.‎ नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२‎ यांचे ग्रेड पेच्या मागणीसाठी संप‎ पुकारला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी‎ काही प्रमाणात महसुली कामांवर‎ परिणाम झाल्याने दिसून आले.‎ विविध जिल्ह्यातील अधिकारी या संपात‎ सहभागी आहेत. तत्पूर्वी नागरिकांना‎ संपादरम्यान कोणतीही समस्या निर्माण‎ होऊ नये, म्हणून मंडळ‎ अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारी‎ सोपवली आहे.‎ सन …

Read More »

नागपूरजवळ बसने घेतला पेट : प्रवाशांमध्ये भीती

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी येथे आज मंगळवारला सकाळी शॉट सर्किटमुळे शिवशाही बसने पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. ही बस नागपूर येथून अमरावती कडे जात होती, तेव्हा अचानक पेट घेतला. ‘विश्व भारत’चे प्रेक्षक तौसिफ़ पठाण यांनी उपरोक्त माहिती दिली.

Read More »

नागपूरकरांना मोठा दणका! वीजेनंतर आता पाण्यासाठी द्यावे लागणार जास्त पैसे

राज्यात 1 एप्रिलपासून वीजदरवाढ लागू केली.त्यामुळे आधीच महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा रिकामा होत आहे. RBI EMI, कर्जावरील व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे खिशाला कात्री लागली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. अशातच आता नागपूरकरांना पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. नागपूरमध्ये वीज दरवाढीनंतर आता पाणीपट्टीही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या महिन्यापासूनच हा नियम …

Read More »

जान्हवी कपूरने पकडला मुख्यमंत्र्याच्या नातवाचा हात : लग्नाची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच काही व्यक्तींशी नाव जोडलं गेलं. त्यातीलच एक म्हणजे शिखर पहारिया. जान्हवी व शिखर यांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर एकत्रित व्हायरल होताना दिसतात. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा एकत्रित व्हिडीओ समोर आला आहे. जान्हवी काय म्हणाली? “वाढदिवसाच्या शुभेच्छा शिखू”. शिखरच्या टोपण नावाने जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. …

Read More »

डीएड अभ्यासक्रम बंद : शिक्षक कसे होणार? वाचा

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचे ठरविल्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत …

Read More »

मनिषा कोईराला म्हणते…नवरा माझा शत्रू

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाची गणना ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा अनेक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त मनिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. तिचं नाव नाना पाटेकरबरोबर जोडलं गेलं, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण त्यानंतर मनिषाने नेपाळचे बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं, …

Read More »

‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. देवनाथ गंडाटे २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत …

Read More »

‘पीडब्लूडी’चे मनोज सौनिक होणार राज्याचे मुख्य सचिव! : श्रीवास्तव एप्रिलमध्ये निवृत्त

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती होऊ शकते. तर, सौनिक यांच्या पत्नी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत आहे. गोड गळ्याचे मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव …

Read More »

नागपूरजवळील घटना : चंदनाच्या हजारो झाडांना लागली आग

चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल एक हजार चंदनाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही आग नैसर्गिक की मानवनिर्मित याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगली देवतळे येथे जयंत नौकरकार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात चंदनाची सुमारे एक हजार तर इतर फळांची सुमारे ६०० झाडे लावली होती. दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या …

Read More »

32 वाळू माफियांवर गुन्हे दाखल

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातुन ट्रॅक्टर केणी द्वारे अवैध वाळू उपसा व साठा करणाऱ्या 32 जणांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईट येथील 70 ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा पोलीस कॉलनीत हलविण्यात आला आहे, अशी माहिती अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे. …

Read More »