Breaking News

विश्व भारत

पितृपक्षाला सुरुवात : महत्व आणि श्राद्धचे नियम

  विश्व भारत ऑनलाईन : पितरांना किंवा पूर्वजांना श्राद्ध टाकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवाडा पितृपक्ष म्हणून मानला जातो. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. हिंदू धर्मात पितृपक्षाला प्रचंड महत्व आहे. लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा 9 व 10 सप्टेंबरला आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरवात होत …

Read More »

नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार

  नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …

Read More »

तावडेंकडे बिहार,जावडेकरांकडे केरळचा अवघड पेपर, मुंडेकडेही जबाबदारी

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. तर,पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार

गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ …

Read More »

राष्ट्रवादीला धक्का, आव्हाड कारणीभूत?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दोन दिवसांपूर्वीचं पक्षाचा राजीनामा दिला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे,असा आरोप गावडेंनी पक्षांतर करताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ते प्रवेश करणार आहेत. काय कारण? जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही …

Read More »

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत. धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन …

Read More »

केदारनाथ धामचे ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन

केदारनाथ : जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा …

Read More »

नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, मेट्रो सुटेल ‘या’ वेळेत

नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ …

Read More »

‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या

मोहन कारेमोरे नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले. राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, …

Read More »

गणपती बाप्पा मोरया,आज जडअंतकरणाने निरोप

नागपूर : कोरोनानंतर निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून आज शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विसर्जन होणार आहेत.यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील. मुंबईत १ लाख, नागपुरात 20 हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल. सर्वत्र पावसाचा इशारा; राज्यात पोलिसांचा बंदोबस्त राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता …

Read More »