Breaking News

Vishwbharat

कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली

वर्धा प्रतिनिधी :-  कारंजा पंचायत समितीचे वादग्रस्त गटविकास अधिकारी उमेश नंदागावळी यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे करण्यात आली असून ग्रामविकास विभागाने नांदगावळीसह राज्यातील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या 46 गट विकास विकास अधिकारी यांची बदली करण्यात आली आहे.कारंजा घाडगे येथील गटविकास अधिकारी यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली असल्याचे माहिती मिळाली आहे.

Read More »

कोविड-19 प्रार्दुभावाच्या काळात केन्द्रसरकारने शेतीकरिता व जोडधंदयाकरिता भरिव तरतुद

खासदार रामदास तडस यांच्या प्रश्नाला केन्द्रीय कृषी मंत्री श्री.नरेन्द्र सिंग तोमर जी यांचे उत्तर दिल्ली/वर्धा: लोकसभेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यानंतर वर्धा लोकसभा कोविड-19 च्या प्रादुर्भावा अंतर्गत केन्द्रशासनाने शेतक-यांना कोणती विशेष मदत उपलब्ध करुन दिली याबाबत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतरांकित प्रश्न संख्या 233 अंतर्गत प्रश्न उपस्थित केला.        या प्रश्नाला उत्तर देतांना केन्द्रीय कृषी मंत्री श्री. नरेन्द्र …

Read More »

वर्धा : जिल्हाभर राबविली जाणार “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिम – जिल्हाधिकारी

वर्धा प्रतिनिधी : दि.15 : – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी …

Read More »

वर्धा : कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 रुग्णांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.15 – जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा कहर थांबण्याच नाव घेत नसून त्यासोबतच आता दिवसेंदिवस मृत्यू संख्या ही वाढत आहे.मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा नवीन 112 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यासोबतच आज जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या 61 वर जाऊन पोहचली आहे.तसेच आज 56 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले आहे. आज जिल्ह्यात …

Read More »

Coronavirus : भारतात तीन लशी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या टप्प्यात-ICMR

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली माहिती करोना हे फक्त भारतातलंच नाही तर जगापुढचं आरोग्य संकट झालं आहे. अशात करोना व्हायरसचा प्रतिबंध करणाऱ्या लशींवर काम सुरु आहे. जगातल्या विविध देशांमध्ये ही प्रक्रिया सुरु आहे. भारतही यामध्ये मागे नाही. भारतात तीन लशी या क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम …

Read More »

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?; आशिष शेलारांचा टोला

मुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा दाखला देत भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्यातील सरकारला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून हिणवले आहे. कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं कंगना राणावत हिच्या विरोधात आघाडी उघडली होती. …

Read More »

सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी, मोदी सरकारचा निर्णय

सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कोविड १९ च्या काळात अर्थात करोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला …

Read More »

वर्धा: कोरोना कहर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णासह मृत्यू संखेत होत आहे वाढ : आज 59 कोरोनाबाधित तर 7 व्यक्तींचा मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.14 रोजी आज 586 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 41 पुरुष तर 18 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज झाली आहे आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (हिंगणघाट महिला 60, पुरुष 61,आर्वी महिला 68, पुलगाव पुरुष 67, वर्धा पुरुष 61, …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात भाकपचा निषेध दिन

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष वर्धा जिल्हा च्यावतिने १४ सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय आवाहनानुसार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करुन *मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरुध्द निषेध दिन पाळण्यात आला* या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव  काँ मनोहर पचारे जिल्हासहसचिव काँ असलम पठाण  काँ मारोतराव इमडवार काँ सुरेश गोसावी वंदना कोळणकर मैना उईके विनायक नन्नोरे  ज्योषणा राउत  दुर्गा वाघमारे यांनी केले . …

Read More »