Breaking News

Breaking News

केंद्रीय मंत्र्याचा अपघात : कारला दिली ट्रकने धडक

केंद्रीय कायदा व विधी मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून किरेन रिजिजू बचावले आहेत. किरेन रिजिजू एकदम सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांना दुखापत झाल्याचे कळते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

Read More »

डीएड अभ्यासक्रम बंद : शिक्षक कसे होणार? वाचा

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचे ठरविल्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत …

Read More »

Maharashtra Unseasonal Rain | नंदुरबारमध्ये वादळी पावसाने बाजारपेठ उध्वस्त : जनावरांचाही मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्याने पीक व बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. नवापूर आणि नंदुरबार येथे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी झाडे कोसळले व घरांचे पत्रेही उडाले. तळोदा अक्कलकुवा धडगाव आणि नंदुरबार या तालुक्यांमध्ये आज सोमवार 6 मार्च रोजी दुपारी तीन ते पाच वाजताच्या दरम्यान धुळीच्या वादळासह अचानक आलेल्या पावसाने मोठे …

Read More »

पहाटेच्या शपथविधीवर कोश्यारींचा गौप्यस्फोट : पवारांवर ताशेरे

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या अनेक गोष्टी अजूनही महाराष्ट्रात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या विधानाने ही घटना पुन्हा केंद्रस्थानी आली. पण सगळ्या घटनांचे साक्षीदार असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबद्दल कधीही बोलले नाही. राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीबद्दल एका चॅनेलवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांनाही सुनावले आहे. शपथविधी… राज्यपाल कुणाला बोलवत नाही. …

Read More »

बेकायदा बांधकामाला पाठबळ : सहायक आयुक्त निलंबित

बेकायदा बांधकामावरील कारवाई करण्यासाठी ज्या दिवशी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, त्याचदिवशी ठाण्यातील दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्यादिवशी त्यांनी कारवाई सुरु केली पण, ती केवळ दिखाव्यापुरतीच होती. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही त्यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले. …

Read More »

एकमेकांना फुल नका देऊ : ‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी गायीला द्या मिठी

फेब्रुवारीत चाहूल लागतेय ती प्रेमाची, ओढ अशी वाढते की हा महिना असाच कायम असावा. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार असतो. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस अर्थात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केले …

Read More »

महिला आमदारावर हल्ला

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा …

Read More »

न्यायमूर्ती गौरी यांची राजकीय पक्षाशी जवळीक : नियुक्तीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मद्रास हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अ‍ॅड. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. ही सुनावणी मंगळवारी अर्थात आज होईल. व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख …

Read More »

औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना जलसंधारणचा अभियंता जाळ्यात

औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून …

Read More »

नाना पटोलेंवर सत्यजित तांबेंचा गंभीर आरोप

✍️मोहन कारेमोरे : नाशिक पदवीधर निवडणुकीतून विजय झालेले सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला जाणीवपूर्वक अडचणीत आणून काँग्रेसने काय साध्य केलं, असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांनी तर माझा फोनही उचलला नाही. माझ्या विरोधात खोटा प्रचार केला, असा आरोप तांबे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस सोडणार का? सत्यजित …

Read More »