Breaking News

पर्यावरण

20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, कोणत्या जिल्ह्यात अलर्ट… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे, सातारा,कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उत्तर,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली. संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी …

Read More »

आफ्रिकेतून 8 चित्ते भारतात दाखल

विश्व भारत ऑनलाईन : आफ्रिकन देश नामिबियातून आज शनिवारी आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. परदेशी चित्ते श्योपूरला पोहोचले नामिबियाचे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर चित्तांसह ग्वाल्हेरहून श्योपूरला पोहोचले आहे. काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना …

Read More »

बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला… कुठे घडली घटना… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मांदळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. लोमेश गुलाब चौधरी असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. वन विभागाने मांदळवाडी, ढगेस्थळ येथे तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनाक्रम असा… मांदळेवाडी येथील विठ्ठल गेनुजी ढगे यांच्या शेतात काम …

Read More »

गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर, भामरागडचा संपर्क तुटला

विश्व भारत ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत. बंद मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता …

Read More »

चित्ता येणार भारतात, वन्यजीव प्रेमीत उत्सुकता

विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्याही नोंदी आहेत. आता हाच चित्ता भारतातील मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात 17 सप्टेंबर रोजी नामीबिया येथून पोहचणार आहे. भारत सरकारने भारतात पुन्हा चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्यासाठी ‘चित्ता री-इंट्रोडक्शन’ हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. …

Read More »

गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार

गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ …

Read More »

एक चिखलात फसून, दुसरा अपघातात बिबट ठार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्र आणि रामटेक वनपरिक्षेत्रात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. पहिल्या घटनेत गुरुवारी संध्याकाळी पटगोवरी गावानजीक सर्वे क्रमांक ३३९ येथे चिखलात फसून बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट चिखलात फसलेला असताना नागपूर येथील रेस्क्यु पथकाला पाचारण केले.त्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत …

Read More »

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन : पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती,पुणे, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. …

Read More »

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे …

Read More »