Breaking News

विश्व भारत

नागपुरात थंडीमुळे दोघांचा मृत्यू

नागपुरात थंडीचा जोर वाढला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. डिसेंबरपर्यंत थंडी कमी होती. अचानक थंडीचा पारा वाढला आहे. लोकं शेकोटीचा आधार घेत आहेत. मागील दोन दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. शनिवारी सूर्यदर्शन झाले. पण, थंड हवांचा जोर कायमच आहे. या थंडीत दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. येत्या काळात पुन्हा थंडी वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read More »

‘पीडब्लूडी’चे दुर्लक्ष : गौण खनिज वाहतुकीमुळे ग्रामीण रस्त्यांची लागली वाट

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते तयार कारण्यात आले. या उभारलेल्या रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या गौण खनिजाची अवजड वाहनाद्वारे करण्यात येते. वाहतुकीमुळे ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग व जिल्हा प्रमुख मार्गांची चाळण झाली आहे. त्यामुळे एमएसआरडीसी आणि एनएचएकडून जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता मोबदला पाहिजे. यासंदर्भात सध्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम …

Read More »

उंचीनुसार मुलींचे वजन किती पाहिजे…!

सध्याच्या घडीला फीट आणि निरोगी राहणं हे एक मोठं आव्हान आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ,अयोग्य आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते. वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते …

Read More »

परस्पर विकली 400 एकर जमीन

कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केली. मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले आहे,असा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर …

Read More »

शरीराची थंडी कमी करण्यासाठी काय कराल? वाचा…

थंडी वाढत आहे. थंडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही खास गोष्टी तुम्हाला करता येतील. काही पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील. ✳️हिवाळ्यात बदामाचे दूध पिणेही फायदेशीर असते. बदामाचा प्रभाव उष्ण असतो. हे तुमचे शरीर गरम करेल. बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल. ✳️लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. गरम लिंबू पाणी प्यायल्याने …

Read More »

विभागीय आयुक्त कधी देणार अहवाल? भ्रष्ट अभियंता गोडसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘गोड’

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, गोडसेवर अजूनही निर्णय …

Read More »

नेत्याच्या मुलाच्या लग्नात 900 जणांना विषबाधा

औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 900 जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे. लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 900 जणांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांनी औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांचे पुत्र सय्यद जुबेरचा लग्नसोहळा बुधवारी 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी …

Read More »

गडकरींनी घटविले 56 किलो वजन : कोणते व्यायाम करतात?

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वजन कमी करून अनेकांना थक्क केले आहे. वजनच नव्हे तर एकूणच गडकरींच्या तब्येतीत सुधार दिसून येत आहे. करोनानंतर गडकरींनी आपल्या जीवनशैलीत केलेले काही बदल त्यांनी सांगितले.135 वरून 89 आणलेलं वजन आणि श्र्वसन संबंधित तक्रारी दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम व व्यायामाची मदत झाल्याचे गडकरी सांगतात. पैसे हे जीवनाचं साधन आहे, ध्येय नाही, असं म्हणत गडकरींनी …

Read More »

चंद्रपुरात वाघांच्या बंदोबस्तासाठी तहसीलवर मोर्चा

चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील जंगलव्याप्त गावामध्ये वाघांनी धुकाकूळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांचे जीव वाघाच्या हल्ल्यात गेले आहेत. वनविभाग वाघांच्या बंदोबस्तासाठी अपयशी ठरल्याने वाघांच्या हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वात बुधवारी सकाळी राज्य शासनाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोघा व्यक्तींनी वाघांची वेशभूषा धारण करून जंगलभागातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाला साकडे घातले. या गावातील नागरिक …

Read More »

विदर्भात दोन दिवस पाऊस : हवेत वाढला गारठा

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढलाय. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी, नागपूर आणि परिसरात काल (मंगळवार) रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान …

Read More »