Breaking News

विश्व भारत

डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय कराल?वाचा…

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि धावपळीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. हिवाळा सुरु झाला असून वातावरण बदललं की आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या सुरु होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. ज्याचा डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होतो. आयुर्वेदिक आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुमची दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात. ✳️रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप फायदेशीर आहे. …

Read More »

लक्ष द्या ! बेशिस्तपणे वाहने पार्क करताय… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सध्या नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नागरिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करीत आहेत. रोषच नव्हे तर तक्रारीही करीत आहेत. अलीकडेच शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैनने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला होता. यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित …

Read More »

कलाकारांचा लढा ‘कॅन्सर’सोबत

बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. तुमच्या आजुबाजूला पाहिलं तर एक-दोन रुग्ण कॅन्सरची पाहायला मिळतील. मनोरंजन विश्वातही असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कॅन्सर झाला होता. अलिकडचं उदाहरण द्याचयं म्हणजे ‘परदेस‘ फेम महिमा चौधरी हिला कॅन्सर झाला होता. बऱ्याच कलाकारांनी दुर्धर अशा कॅन्सर वर मात करत नव्याने मनोरंजन विश्वात आपल्या कलेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज आहे जागतिक कॅन्सर जनजागृती …

Read More »

मीठ कसे आणि किती खावे? तुमच्यासाठी कोणते मीठ योग्य

मीठ हे आयोडीन आणि सोडीयमचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याचप्रमाणे सोडियम आणि आयोडीनचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो. अनेकदा याची कमतरता समस्या निर्माण करते. पेशींच्या योग्य कार्य आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीतच मीठ शरीराचा आवश्यक भाग आहे, पण मिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे. टेबल सॉल्ट किंवा सामान्य मीठ …

Read More »

गडचिरोलीत हत्तीचा हल्ला : एक ठार, पिकाचेही नुकसान

कोरची तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने एका (७० वर्षीय) वद्धास पायाखाली तुडवून ठार केली.ही घटना तलवारगड गावात घडली. धनसिंग टेकाम असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या हत्तींनी गावातील काही घरे आणि धानपिकांचेही नुकसान केले. तलवारगड हे गाव दुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असून, टिपागड डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावात ८ घरे आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

मोबाईल : 6 वर्षीय मुलाने आईच्या बँक खात्यातून उडविले 1 लाख 78 हजार

पालकांचे मोबाइल वापरत त्यावर दिवसभर ऑनलाईन गेम मुले खेळतात. ऑनलाईन गेमचा फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागतोय. एका अवघ्या ६ वर्षीय मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आईच्या बँक खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये उडविले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच पालकांनी सायबर सेलकडे धाव घेतले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता मुलाने गेमच्या नादात आई वडिलांचे …

Read More »

भारत जोडोत जात असताना काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झालाय. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी हा अपघात झाला. यावेळी नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. सुदैवाने या अपघातात नसीम खान यांना फारशी दुखापत झालेली नाही. केवळ …

Read More »

कर्मचाऱ्यांना शासकीय निवासात मुक्कामाची सक्ती : नातेवाईकांकडे थांबल्यास कारवाई

मुंबईहून नागपूरला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल. नातेवाईकांकडे थांबल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारी खोलीत जागा मिळणार नाही, असे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईहून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील १६० खोल्यांच्या इमारतींमध्ये केली जाते. प्रत्येक खोलीत पाच जणांची व्यवस्था असते. कर्मचाऱ्यांनी मुंबई सोडण्यापूर्वीच नागपुरातील खोली वाटपाचे नियोजन झालेले असते व त्यानुसार कर्मचाऱ्यांना नागपुरात पोहोचल्यावर मिळालेल्या …

Read More »

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले. शिरूर वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्‍हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले. यासंदर्भात माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, …

Read More »

प्रवाशांची गैरसोय : विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

सालवा येथे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार ६, साेमवार ७ आणि मंगळवार ८ नोव्हेंबरची विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. दुरंतो, शालिमार-एलटीटी अप-डाऊन ट्रेनच्या मार्गामध्येही बदल करण्यात आला आहे. भडली येथे करण्यात येणाऱ्या कामासाठी १२११४ नागपूर-पुणे मंगळवारी ८ नोव्हेंबर आणि १२११३ पुणे-नागपूर बुधवारी ९ नोव्हेंबर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वेळेवर मोठ्या …

Read More »