Breaking News

विश्व भारत

शिंगाडे : कॅन्सर,ऍसिडिटी,त्वचेच्या समस्या होतील दूर आणि बरेच काही…

गुलाबी थंडी वाढतेय. लोकांना हिवाळा तसाही खूप आवडतो. या ऋतूमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. हिवाळ्यात शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनटचा आनंद घेणे कोणाला आवडत नाही. पाण्यात उगवणारी ही भाजी चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया शिंगाड्याचे फायदे… शिंगाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरी कमी आणि न्यूट्रिशन जास्त आहे. तसेच हा फायबरचा चांगला स्रोत आहे. …

Read More »

चिंतेत भर : सरावादरम्यान विराट कोहली जखमी!

रोहित शर्माला सरावादरम्यान दुखापत झाल्याचे समोर आले होते. त्याचा उजवा हात दुखावला होता. मात्र, रोहितने मी पूर्णपणे तंदुरुस्त असून मला दुखापत झाली होती, मात्र आता मी बरा असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. पण आता रोहित नंतर संघाचा प्रमुख खेळाडू जखमी झाल्याचे वृत्त समोर आले. रोहितनंतर विराट कोहली अॅडलेडमध्ये सराव करताना जखमी झाला. वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने फेकलेला चेंडू विराटच्या …

Read More »

आजपासून आचारसंहिता लागू : थेट सरपंच पदांसाठी 18 डिसेंबरला मतदान

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,तसेच नव्याने …

Read More »

७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, जनतेतून सरपंचांची निवड

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका …

Read More »

मन सुन्न : मुलींवर विनयभंग, अत्याचार

विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिली घटना- हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना – व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर …

Read More »

अमरावतीत विवाहितेची विष घेऊन आत्महत्या

अमरावतीमधील विलासनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासूविरुद्ध कौंटूबिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. विलास विजय रामटेके असे गुन्हा दाखल झालेल्या मृत विवाहितेच्या पतीचे नाव आहे. विलासने तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर विलास हा सतत मुलीला मारहाण …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेत घोटाळा : मृतकांच्या नावाची पेन्शन नातेवाईकांच्या खात्यात, महिन्याला 5 लाखाची कमाई

जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा उघडकीस आलाय. मृतकांच्या नावाची पेन्शन रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जात होती. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. यात कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आले.जिल्हा परिषद सीईओ यांनी चौकशी समिती गठीत केली. या पेन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महिला लिपिकाकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या …

Read More »

लघवीतील बदल, किडनीचे मोठे नुकसान

किडनी आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते. किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या …

Read More »

सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध केला जात आहे. अब्दुल सत्तारांची दिलगीरी नको. सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देणार असल्याचे जालन्यातील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. ‘अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस’ असे राष्ट्रवादीच्या …

Read More »

नितीन गडकरींनी मागितली जनतेची माफी : वाचा… कारण

चूक असेल तर त्यासाठी माफी मागण्यात काही कमीपणा वाटत नाही. मंडला ते जबलपूर जो मार्ग आहे, त्यामध्ये बरेला ते मंडला हे ४०० कोटींचे ६३ किलोमीटरचे जे दोन लेनचे काम होत आहे, त्यावर मी समाधानी नाही. आता समस्या ही आहे, की अनेक अडचणी आल्या आहेत आणि अनेकदा तुम्हाला त्रास होत आहे. आज मी येथे येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. प्रलंबित कामाला …

Read More »