Breaking News

विश्व भारत

दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण

विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …

Read More »

5G च्या नावाने फसवणूक, तुम्हालाही ‘हा’ मेसेज आल्यास सावधान

विश्व भारत ऑनलाईन : देशात 5G सेवा सुरु झाली.या सेवेची घोषणा होताच एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी निवडक शहरांमध्ये 5G सेवेला सुरुवात केली आहे. यानंतर ग्राहकांची देखील स्मार्टफोनमध्ये 5G सेवा सुरु करण्याची लगबग सुरु झाली.या संधीचा फायदा घेत काही सायबर चोरट्यांनी फेक मेसेज पाठवत, ग्राहकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर वेळीच सावध …

Read More »

वाळूमाफीयांकडून तहसीलदारांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; आठ आरोपींविरूद्ध गुन्हा

विश्व भारत ऑनलाईन : वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यात ही घटना घडली. पथकाला धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी …

Read More »

दुपारचे जेवण टाळले तरी ओके : पण, ब्रेकफास्‍ट कराच ? अन्यथा शरीरावर दुष्‍परिणाम

विश्व भारत ऑनलाईन : जर तुम्‍ही दुपारचे जेवण टाळत असाल तर ओके. पण सकाळचा नास्टा अर्थात ब्रेकफास्‍ट चुकवू नका, एवढा सोप्‍या शब्‍दांमध्‍ये तुम्‍हाला सकाळच्‍या ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व डॉक्‍टर आणि आहारतज्‍ज्ञ सांगतात. मात्र अलिकडे इंटरनेटच्‍या माध्‍यमातून वजन कमी करण्‍यासाठी दोन जेवणामध्‍ये अधिक अंतर ठेवण्‍याचा सल्‍ला दिला जातो. तसेच अनेकजण धावपळीत विशेषत: गृहिणी व शाळकरी मुले ब्रेकफास्‍टची वेळ चुकवतात. आहारतज्‍ज्ञानी ब्रेकफास्‍टचे महत्त्‍व सांगितले …

Read More »

महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : पीएम किसान सन्मानचा बारावा हफ्ता सोमवारी बँक खात्यात

विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट मोदी सरकारने दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असून, सोमवारी दिला जाणारा हप्ता हा बारावा राहणार आहे. देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अर्थात डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक …

Read More »

नवोदित वकिलांसाठी सरन्यायाधीशांचा सल्ला : अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका

विश्व भारत ऑनलाईन : “वकिली व्यवसायात कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान मोठे आहे. तरुण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यवसायात सुरूवातीला अनेक अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा”, असा सल्‍ला सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या राज्यस्तरीय वकील परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून …

Read More »

शाळेत नापास, पण आता IAS, IPS अधिकारी, वाचा यशोगाथा

विश्व भारत ऑनलाईन : देशातील सर्वात ‘टफ’ परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) असते. विद्यार्थी दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयएएस, आयपीएस होतात. पण, आयपीएस,आयएएस अधिकारी होणे वाटते तितके सोपी नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस,आयपीएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी उत्तीर्ण झालेत. रुक्मणी …

Read More »

फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र : अंधेरी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे

विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? …

Read More »

मणक्यांच्या विकाराकडे दुर्लक्ष केल्यास चालणेही त्रासदायक

विश्व भारत ऑनलाईन : बदलत असणारी जीवनशैली, त्यात ड जीवनसत्त्व व कॅल्शियमची उणीव आणि उपचारांदरम्यान घेतलेल्या ‘स्टेराॅईड’मुळे आलेली ठिसूळता, करोनानंतर वर्क फ्राॅम होमची वाढती संस्कृती, अशा कारणांनी तरुणांमध्ये मणक्यांचे विकार वाढत आहेत. १६ ऑक्टोंबरला जागतिक स्पाईन दिवस आहे. पाठीच्या मणक्यांच्या विकारात करोनापूर्वी आणि करोनानंतर ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यात १८ ते ३५ वयोगटातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. …

Read More »