विश्व भारत ऑनलाईन : मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.शिंदेंनी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवले होते. त्यामुळे काही जणांमध्ये अस्वस्था असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप केला. काही दिवसांतच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार स्थिर आहे. सरकारमध्ये कोणतीही अस्वस्थता नाही. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल …
Read More »‘सप्तश्रुंगी हिल’ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी : महसूल, परिवहन विभागाचे कर्मचारी होणार सहभागी
विश्व भारत ऑनलाईन : लाखो भाविकांचे सप्तश्रुंगी देवी श्रद्धास्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. श्री सप्तश्रुंगी निवासिनी देवी ट्रस्ट व नाशिक रनर्स आयोजित सप्तश्रुंगी हिल मॅरेथॉन 2022 सहावे पर्व’ रविवारी आयोजित केले आहे.या मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्यविषयक जागरूकता अधोरेखित करण्याचा नाशिक रनर्स ग्रुपचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अशी असेल स्पर्धा? ही स्पर्धा …
Read More »भाजप आक्रमक : सहायक निबंधक अखेर निलंबित
विश्व भारत ऑनलाईन : भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना अखेर निलंबित केले आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या सहायक निबंधक यांच्यावरील कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी एकवीरा गृहनिर्माण सोसायटी तळेगाव दाभाडे, पवना कृषक संस्था, काले कॉलनी व मावळ तालुक्यातील …
Read More »गोंदियातील हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने
विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. परिणामी,वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहे. नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. …
Read More »बाबुंना पाहिजे चहापाण्याचा खर्च, पत्नीपेक्षा अधिकाऱ्यांचे फाईलवर जास्त प्रेम – नितीन गडकरींची टीका
विश्व भारत ऑनलाईन : एक फाईल पुढे सरकायला दीड वर्ष लागतात. प्रत्येक टेबलवरील शासकीय बाबू चहापाण्याचा खर्च मागतो. आर्थिक व्यवहाराशिवाय काम होतच नाही. शासकीय कामात वेळेचे पालनच होत नाही, असे रोखठोक मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. ते नागपुरात बोलत होते.काही अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात. वनविभागाकडे विकासकामाशी संबंधित 17 प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून …
Read More »बिनशेती परवानगी ऑनलाईन होणार, तर गुंठेवारीवरही लवकरच धोरण : महसूल मंत्री
विश्व भारत ऑनलाईन : बिनशेती परवानगी (एनए अॅक्ट) आणि गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. तसेच यात बेकायदेशीर प्रकारही होत आहेत. त्यामुळे या सर्व बाबी टाळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी शासन धोरण निश्चित करणार असून, एनए परवानगी देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नाशिक दौर्यावर आले असता, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार …
Read More »आयएएस अधिकाऱ्याला अटक, तर एक जिल्हाधिकारी बेपत्ता… वाचा काय आहे प्रकरण…
विश्व भारत ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) छत्तीसगढमधील आयएएस अधिकारी समीर विश्नोई यांच्यासह दोघांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. कारवाईनंतर राज्यातील अधिकारी आणि नेते अवैध कोळसा वाहतुकीतून दिवसाला तब्बल दोन ते तीन कोटी उत्पन्न मिळवत असल्याचा दावा ईडीने केलाय. समीर विश्नोई आणि त्यांच्या पत्नीकडून ४७ लाखांची बेहिशेबी रोख आणि ४ किलो सोन्याचे दागिने जप्त केले. प्रकरणात ईडीने आत्तापर्यंत साडेचार कोटींची …
Read More »शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : खरीप ई-पीक पाहणीसाठी आज शेवटची संधी
विश्व भारत ऑनलाईन : खरीप हंगामातील ई-पीक पाहणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल लावण्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे खाण्याची आवश्यकता नाही. शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, …
Read More »817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर
विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …
Read More »दिवाळी : एसटीचे तिकीट 10 टक्क्यांनी वाढणार ; पासधारकांना वगळले
विश्व भारत ऑनलाईन : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत एसटी महामंडळाने भाडेवाढ करून जोरदार दणका दिलाय. दिवाळीत दहा टक्क्यांनी तिकीट महागणार आहे.महामंडळाने महसूल वाढीसाठी ही भाडेवाढ केली. अशी आहे भाडेवाढ… एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही 20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या …
Read More »
विश्वभारत News Website