Breaking News

क्राईम

वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई

भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्‍तपणे केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्‍ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे …

Read More »

फडणवीसांविरोधात फेसबुक पोस्ट : पुण्यात तरुणाविरोधात गुन्हा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असे या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महविकास आघाडी …

Read More »

कैद्याला मागितली 50 हजाराची लाच : हवालदारासह महिलेला पकडले

पॅरोलवरील कैद्याकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील हवालदार बाजीराव जोतिबा पाटील (वय 54) आणि रेहाना आसिफ सय्यद (वय 48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून, सध्या तो कारागृहाबाहेर आहे. यादरम्यान हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला 50 हजार रुपयांची लाच …

Read More »

मटण सूपमध्ये भात का?मारहाणीत वेटरचा मृत्यू

मटणाच्या सूपमध्ये भात का दिलाय,तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असे प्रश्न विचारत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत वेटर गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात घटना घडली आहे. माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत …

Read More »

11 दुचाकी, ऑटो चोरणाऱ्यांना अमरावतीत अटक : वाचा नागपूर कनेक्शन…

अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय आहेत. पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येताच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने सूत्रे हलवत तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त केले. त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मंगवारी गस्त घालत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की,दोन व्यक्ती चित्रा चौकात …

Read More »

नागपुरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. …

Read More »

‘पीडब्ल्यूडी’च्या कामात 25 लाखांची फसवणूक

सार्वजनिक बांधकाम विभागाची (पीडब्ल्यूडी) कामे मिळवून देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सचिन साळुंके,रा. आंबेगाव, कात्रज याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. समीर शशिकांत रहाटे (वय 46, रा. मुलुंड) यांनी फिर्याद दिली. समीर यांची एस. आर. ग्लोबल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. त्यांनी या कंपनीच्याच नावाने पीडब्ल्यूडीचे काम करण्याचे लायसन्स काढले आहे. लायसन्स काढल्यानंतर कामे मिळविण्यासाठी …

Read More »

‘तिने’ दिलाय धोका! 80 वर्षांच्या आजोबांचे सतरा लाख बुडाले

एका बँकेतील गलेलठ्ठ पगाराच्या पदावरून निवृत्त झालेल्या 80 वर्षांच्या आजोबांनी डेटिंग साईटवरील ललनेच्या जाळ्यात अडकून एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 17 लाख 10 हजार रुपये गमावले आहेत. आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रेया नावाच्या महिलेवर पुण्यातील वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी आजोबा हे वारजे-माळवाडी परिसरात राहतात. त्यांचा पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. …

Read More »

तहसीलदार दोन लाख, तर अमरावतीच्या मुख्याधिकारी २० हजार घेताना अटकेत

तब्ब्ल दोन लाखांची लाच घेतल्याने अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली. मिनल कृष्णा दळवी असे अटक केलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. दुसरी घटना अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य …

Read More »

मन सुन्न : मुलींवर विनयभंग, अत्याचार

विनयभंग आणि अत्याचाराच्या तीन घटना घडल्या. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिली घटना- हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नराधमाने एका ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केली. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दुसरी घटना – व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर …

Read More »