ताटातून गायब झालेल्या भाकरीला पुन्हा मागणी वाढू लागल्याने जुने ते सोने म्हणण्याची वेळ आली आहे.मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा हुरडा आता डोळ्यांनीही दिसेनासा झाला आहे, तर गरिबाची म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या ताटात दिमाखात मिरवणारी भाकरी कालौघांत गरिबांच्याही ताटातून बाद झाली आहे. ती आता थेट हॉटेल, भोजनालयांमधील …
Read More »हिवाळ्यात मुलांची घ्या काळजी!त्यांना ठेवा ‘उबदार’
ऋतुमानाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. याचा सर्वात पहिला आणि अधिक परिणाम मुलांवर होतो. थंड हवा आणि वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊन सारखे आजारी पडू शकतात. म्हणून वेळीच योग्य काळजी घेतल्यास, तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवणे शक्य आहे. कडाक्याच्या थंडीत खालील टीप्स फॉलो करुन तुम्ही मुलांना उबदार वातावरण देवू शकता. मुलं पाणी पितात का? याकडे आवर्जून लक्ष द्या थंडीच्या दिवसात मुलांना …
Read More »अटॅकचे सर्वात मोठे कारण एकटेपणा : भावना व्यक्त करा, दीर्घ श्वास घ्या
एकटेपणा कधी आनंद तर कधी निराशेत घेऊन जाऊ शकतो. तसेच एकटेपणा हे पॅनिक अॅटॅकचे सर्वात मोठे कारण आहे. सतत चिंताग्रस्त व तणावग्रस्त राहिल्याने पॅनिक अॅटॅकचा धोका वाढतो. मनाची भीती किंवा मनातील भावना व्यक्त करू न शकल्यामुळे तो फोबिया किंवा ध्यास बनतो. याचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. विशेषतः बालके व किशोरवयीन मुलांना, मुलींना धोका जास्त असतो. विशीपर्यंत पॅनिक अॅटॅकचा धोका सर्वाधिक …
Read More »दोन वेळा कॅन्सर, हृदयविकारानेही गाठले : अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर
अभिनेत्री ऐंद्रिला शर्माला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऐंद्रिला शर्माला हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला अचानक स्ट्रोक आल्याने मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. त्यानंतर अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकारी लक्ष देईना : पुराव्यासह आमदाराची तक्रार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र,मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे एक महिन्यापासून जिल्हा उपनिबंधकांनी आदेश डावलून प्रशासकाची नेमणूक केली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा उपनिबंधकांविरोधात पुराव्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता सहकार विभागाकडून जिल्हा उपनिबंधकावर काय कारवाई करण्यात …
Read More »मटण सूपमध्ये भात का?मारहाणीत वेटरचा मृत्यू
मटणाच्या सूपमध्ये भात का दिलाय,तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असे प्रश्न विचारत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत वेटर गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात घटना घडली आहे. माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत …
Read More »11 दुचाकी, ऑटो चोरणाऱ्यांना अमरावतीत अटक : वाचा नागपूर कनेक्शन…
अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय आहेत. पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येताच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने सूत्रे हलवत तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त केले. त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मंगवारी गस्त घालत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की,दोन व्यक्ती चित्रा चौकात …
Read More »शिवसेनेने बेईमानी केली, आम्ही जागा दाखवली
शिवसेनेसोबत २०१४ मध्ये युती करायला तयार होतो. मात्र अवघ्या चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. युती तोडल्यानंतर ११८ जागांवर लढणारा भाजप एका दिवसात २८८ जागा लढायला तयार झाला. त्याचं एकमेव कारण होते ते म्हणजे अमित शाह. अमित शाह हे आपल्यासोबत होते. दोन महिने अमित शाह महाराष्ट्रात येऊन राहिले. निवडणुकीचे तंत्र त्यांनी आपल्याला शिकवले,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्यासोबत शिवसेनेने …
Read More »‘महसूल’ची डोकेदुखी : विधान परिषदेचे अर्ज अर्धवट; नागरिकांना फोन करून कागदपत्रांची मागणी
विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधरांनी ऑनलाईन दाखल केलेले अनेक अर्ज अर्धवट आहेत. त्यामुळे महसूल खात्याची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना फोन करुन कागदपत्रे मागविली जात आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,नागरिकांनी अर्ज देताना पुरक कागदपत्रांचे स्कॅनिंग केले. परंतु त्यातील बहुतेक तपशिल उमटले नाहीत. ते तपशिल जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतत फोन करुन त्यांच्याकडून माहिती मागविली जात आहे.अमरावती तहसील …
Read More »पोलीस भरतीसाठी सराव करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू
वसईत पोलीस भरतीसाठी सराव करताना एका 22 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. पोलीस भरतीचा सराव करताना प्रतीकला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला मृत्यूने कवटाळलं. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. …
Read More »
विश्वभारत News Website