विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीमार्फत नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ई-पीक करण्याची मुदत 15 …
Read More »अरे देवा!औरंगाबादमध्ये रस्ता दुरावस्थेचा फटका पार्थिवालाही
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबतची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना व अवहेलना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही हृदयद्रावक घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत …
Read More »चिकन खरेदी करताय? मग वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : श्रावण, गणेशोत्सवात काही दिवस मांसाहाराला विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खवय्यांची पावलं चिकन, मटण, मासे आणि तत्सम पदार्थांकडे वळली आहेत. पण, काही घरांमध्ये मात्र अद्यापही चिकन आणि मटणवर ताव मारला जात नाही. ठरतोय तो म्हणजे सध्या सुरु असणारा पितृ पंधरवडा. पितृपक्ष सुरु झाल्यामुळं पितरांच्या नावानं अनेक घरांमध्ये घास काढण्याची परंपरा आहे. यामध्ये बऱ्याच भाज्यांचा वापर केला …
Read More »कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांना परवडणाऱ्या ३८४ आवश्यक औषधांची यादी तब्बल सात वर्षांनंतर मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केली. या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अनेक अँटिबायोटिक्स, कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि लशी स्वस्त होतील. ३८४ आवश्यक औषधांच्या नव्या राष्ट्रीय यादीत अंतर्स्रावी, हृदय आणि रक्तनलिकांच्या देखभालीसाठीच्या तसेच गर्भनिरोधक, श्वसन आणि नेत्ररोगाशी संबंधित औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सर्वांना औषध, …
Read More »शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा,लवकरच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
विश्व भारत ऑनलाईन : मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बऱ्याच आयएएस अधिकाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. काही मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात होऊ शकते. तर, यातील काही बदल्या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बाजूला करण्याची नियोजन या सरकारचे आहे. अनेक …
Read More »23 सप्टेंबरला नागपुरात रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी
विश्व भारत ऑनलाईन: नागपूर येथील जामठा स्टेडियमवर विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून (व्हीसीए)तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २३ सप्टेंबरला जामठा येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला जाणार आहे. नव्याने स्थापित केलेल्या एलईडी फ्लड लाइट्स अंतर्गत हा खेळ दिवस-रात्र खेळला जाईल. या स्टेडियमची क्षमता ४४ हजार प्रेक्षकांची आहे. जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्याचे …
Read More »वैष्णवी बालपांडेचे ‘एमबीबीएस’परीक्षेसाठी यश
नागपूर : वैद्यकीय अर्थात एमबीबीएस (MBBS) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत नरखेड तालुक्यातील मोहगाव(भदाडे) येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी विठ्ठल बालपांडे हिने यश मिळविले. तिला 720 पैकी 681 गुण मिळाले. देश पातळीवर 657 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्धारित केले. वैष्णवीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील, शिक्षकांना दिले आहे.
Read More »शिंदे-फडणवीसांनी मंत्री सत्तारला सुनावले… कारण? वाचा सविस्तर…
विश्व भारत ऑनलाईन : पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशाच योजनेचा विचार सुरु असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलले होते. मात्र,अजून निर्णय झालेला नसताना प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी माहिती दिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे प्रसिद्धीलोलुप मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली. नवे सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा …
Read More »पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे
विश्व भारत ऑनलाईन : बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या गावांना फटका तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या …
Read More »गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर, भामरागडचा संपर्क तुटला
विश्व भारत ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत. बंद मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता …
Read More »
विश्वभारत News Website