Breaking News

विश्व भारत

आमदार बंबविरोधात उद्या शिक्षकांचा मोर्चा

औरंगाबाद : खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यालयी उपस्थित राहत नाही, या शिक्षकांवरील आरोपानंतर बंब यांच्याविरोधात शिक्षकांसह पदवीधर, शिक्षक आमदार आक्रमक झालेत.औरंगाबादमधील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत रविवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत. काय म्हणाले होते बंब मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शासनाची …

Read More »

235 वर्षांपूर्वीची परंपरा..!नागपूरमध्ये भोसल्यांच्या मस्कऱ्या बाप्पाचे मंगळवारी आगमन

  विश्व भारत ऑनलाईन : संत्रानगरीतील ऐतिहासिक मस्कऱ्या बाप्पांचे मंगळवारी आगमन होणार आहे. यंदा या गणपतीला 235 वर्षे पूर्ण होत आहेत. इ. स. 1787 मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवात कशी झाली… श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी 1787 मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा …

Read More »

नागपूर जिल्ह्यात आधार जोडणी अभियान

नागपूर : मतदार नोंदणीला आधार क्रमांक जोडण्यासाठी मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिर रविवारी, 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आयोजित केले आहे. तरी जिल्ह्यातील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. प्रक्रिया सुयोग्य मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम १ ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील …

Read More »

पितृपक्षाला सुरुवात : महत्व आणि श्राद्धचे नियम

  विश्व भारत ऑनलाईन : पितरांना किंवा पूर्वजांना श्राद्ध टाकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवाडा पितृपक्ष म्हणून मानला जातो. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. हिंदू धर्मात पितृपक्षाला प्रचंड महत्व आहे. लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. यावर्षी भाद्रपद पौर्णिमा 9 व 10 सप्टेंबरला आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरवात होत …

Read More »

नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार

  नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …

Read More »

तावडेंकडे बिहार,जावडेकरांकडे केरळचा अवघड पेपर, मुंडेकडेही जबाबदारी

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील प्रभारींच्या नावांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, विजया राहटकर यांच्याकडे महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली. तर,पंकजा मुंडे यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार

गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ …

Read More »

राष्ट्रवादीला धक्का, आव्हाड कारणीभूत?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी दोन दिवसांपूर्वीचं पक्षाचा राजीनामा दिला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उपऱ्या नेत्यांचा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे,असा आरोप गावडेंनी पक्षांतर करताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ते प्रवेश करणार आहेत. काय कारण? जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आणि काही …

Read More »

गणपती विसर्जन,तिघांचा मृत्यू

वर्धा : गणेश विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत. धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन …

Read More »

केदारनाथ धामचे ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन

केदारनाथ : जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत.यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. २०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा …

Read More »