Breaking News

विश्व भारत

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोहन कारेमोरे यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा

मुंबई : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयाचे उंबरडे झिझवावे लागते. विविध ठिकाणी विशेष करून मराठवाडा,विदर्भात मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना …

Read More »

सप्तश्रृंगी देवीचे घ्या दर्शन,26 सप्टेंबरपासून उघडणार मंदीर

नाशिक : जगप्रसिद्ध सप्तश्रृंगी देवीचे मंदीर मागील 45 दिवसापासून दर्शनासाठी बंद आहे. मात्र, भाविकांची प्रतिक्षा संपली असून नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी मंदीर खुले होणार आहे. मंदीर बंदचे नेमके कारण काय? मंदिराचे काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे.नाशिकमध्ये जुलैमध्ये ढगफूटी झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच झालेल्या पावसामुळे अनेक भावीक जखमी …

Read More »

सरपंच, उपसरपंच मानधनाविना

मुंबई : सरपंच, उपसरपंचांना मानधनासाठी करावी लागणारी भटकंती कायम आहे. त्यामुळे राज्यातील सरपंच, उपसरपंचांसाठी मानधन हे मृगजळ ठरले आहे. राज्यातील २५ हजारांपेक्षा अधिक गावातील सरपंच, उपसरपंचांमध्ये नाराजी आहे. सरपंच-उपसरपंचांचे मानधन देण्याची जबाबदारी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान संस्थेकडे सोपवली होती. यात ग्रामपंचायत संगणक परिचालकांना (डेटा ऑपरेटर) मानधनविषयक माहिती संकलनाची जबाबदारी देण्यात आली. हे संकलन दरमहा करायची अट घालण्यात आली. त्यासंदर्भातील माहिती कधी …

Read More »

रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …

Read More »

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …

Read More »

ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले

औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी …

Read More »

गोंदियाऐवजी नागपुरातून सुटेल विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस

नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते कळमना रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने काही दिवस नागपूरमार्गे अनेक गाड्या रद्द असणार आहेत. तर,विदर्भ एक्स्प्रेस सोमवारी नागपूरहून सुटेल आणि महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार आहे.30 ऑगस्टपासून रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने हावडा मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस सोमवारी आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मंगळवारी गोंदिया ऐवजी नागपूरहून सुटेल. रद्द केलेल्या रेल्वे शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, …

Read More »

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी …

Read More »

सप्टेंबर अखेर राज्यात निवडणूक

– मोहन कारेमोरे नागपूर : महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीवरील प्रशासकाची मुदत 15 सप्टेंबरनंतर संपुष्टात येईल. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु होईल.राज्यातील १८ महापालिका, १६४ नगरपरिषदा, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. १५ सप्टेंबरनंतर प्रशासकाला सहा महिने पूर्ण होत आहेत. राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन : पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती,पुणे, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. …

Read More »