Breaking News

विश्व भारत

‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही …

Read More »

ज्योतिरादित्यचे अशोक चव्हाणसाठी प्रयत्न

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांंना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चर्चा केली.याची सूत्रे थेट दिल्लीतून हलवली जात आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यात प्रमुख भूमिका बजावत आहेत. शिंदे यांनी प्रारंभिक बोलणी केल्यावरच पुढील पावले पडत आहेत, असेही बोलले जात आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता येणे कठीण झाले आहे. चव्हाण यांना आता …

Read More »

116 तरुणांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

  मुंबई : शासकीय नोकरीच्या आमिषाने 116 तरुणांची तब्बल 42 लाख 73 हजार 500 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र शासनाच्या जीएसटी विभागात नोकरीच्या आमिषाने एका टोळीने तरुणांकडून पैसे उकळले होते. या प्रकरणात सात आरोपीविरोधात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशपर्यंत प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे बोलले जात आहे.

Read More »

शेतकऱ्यांची चिंता,पुन्हा बोंडअळीचे सावट

नागपूर : अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. आता त्या पाठोपाठ सोयाबीनची पिकेही किड रोगाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक भागात ऐन शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनवर कीड रोगाचा हल्ला होत असल्याने पानांची अक्षरश चाळणी झाली आहे. विविध जिल्ह्यांत गुलाबी बोंडअळी आढळून आल्यानंतर सोयाबीनवर चक्रीभुंगा आढ‌ळून येत आहे. चक्रीभुंग्याचा प्रादूर्भाव वाढल्यास कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात. …

Read More »

औरंगाबादेत ‘स्वाइन फ्लू’चा धोका!

औरंगाबाद : शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने …

Read More »

चौकशी प्रलंबित, तरीही पदोन्नतीचा प्रस्ताव

– मोहन कारेमोरे मुंबई : जळगावच्या तत्कालीन एका तहसीलदाराविरोधात विभागीय चौकशी प्रलंबित असताना त्यांचा उपजिल्हाधिकारी पदोन्नतीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडून मागितला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागवला आहे, हे विशेष. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. त्यासंदर्भात गुप्ता …

Read More »

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे …

Read More »

माहेरवाशीण गौराईंचे आगमन

अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय. मुहूर्त कोणता? गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, …

Read More »

काँग्रेसचे आमदार जाणार भाजपात! फडणवीस-चव्हाण यांची भेट

  मोहन कारेमोरे मुंबई : सेनेपाठोपाठ आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी …

Read More »

नाशिक, नगरमध्ये ढगफुटी! शेतीचे नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा …

Read More »