विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …
Read More »निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …
Read More »आज सर्वोच्च न्यायालयात २०० जनहित याचिकांवर सुनावणी
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी (दिनांक 12) तब्बल २०० हून अधिक जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल.नागरिकत्व कायद्यासह (सीएए) अन्य काही महत्त्वाच्या याचिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सोमवारच्या कामकाज यादीत जनहित याचिकांचा समावेश आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठासमोर ‘सीएए’वरील याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. २०१९मध्ये न्यायालयाने सीएएअंतर्गत कार्यवाही थांबवण्यास नकार देत केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. गेल्या …
Read More »‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे
नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …
Read More »जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत
विश्व भारत ऑनलाईन : राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबरला राज्यव्यापी रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास 17 लाख कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत आहेत.राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास …
Read More »चित्ता येणार भारतात, वन्यजीव प्रेमीत उत्सुकता
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्याही नोंदी आहेत. आता हाच चित्ता भारतातील मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात 17 सप्टेंबर रोजी नामीबिया येथून पोहचणार आहे. भारत सरकारने भारतात पुन्हा चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्यासाठी ‘चित्ता री-इंट्रोडक्शन’ हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. …
Read More »पोसणाऱ्यांनीच कुत्र्यांचे लसीकरण करावे
विश्व भारत ऑनलाईन : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना अन्नपाणी, खाद्यपदार्थ, बिस्कीट देणाऱ्यांनी या कुत्र्यांचे लसीकरण करावे, तसेच या कुत्र्यांनी कुणावर हल्ला करून जखमी केल्यास उपचाराच्या खर्चाची जबाबदारीही पशुप्रेमींवर टाकली जाऊ शकते, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांशी संबंधित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली त्या वेळी नागरिकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यामध्ये संतुलन राखले गेले पाहिजे, असे मत न्यायालयाने व्यक्त …
Read More »बदलीसाठी आग्रह धरू नका
विश्व भारत ऑनलाईन : भरती झालेले अन्य जिल्ह्यातील शिक्षक नियुक्ती नंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आग्रही असतात. बदली करून घेणे हा तुमचा हक्क आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात भरती झाली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी तत्काळ बदलीचा आग्रह न धरता थोडा धीर धरावा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्न मागील …
Read More »राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल. या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत …
Read More »रेल्वेत नवरात्र, दिवाळीसाठी वेटिंग
विश्व भारत ऑनलाईन : श्रावणपासून उत्सवांची लगबग सुरु झालीय.गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी प्रवाशांना महिनाभर तिकीट मिळत नसल्याचे दिसत आहे.प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. जादा गाड्यांची मागणी मध्य …
Read More »
विश्वभारत News Website