Breaking News

विश्व भारत

सत्तारांचे जमीन प्रकरण अधिवेशनात गाजणार : हरपूरमुळे शिंदे अडचणीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप होत असताना, आता त्यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकरणावरून आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक सत्तार यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार …

Read More »

अब्दुल सत्तारांमुळे वैताग : कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना कोटींचे ‘टार्गेट’?

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून त्यांच्या मतदार संघात अर्थात सिल्लोड येथे कृषी महोत्सव आयोजित केला आहे. पण, यासाठी अधिकाऱ्यांना 15 कोटींचे लक्ष दिले असल्याची माहिती आहे. महोत्सवासाठी संपूर्ण कृषी खाते जणू कृषिमंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचे चित्र आहे. राज्याच्या इतिहासात, आजवर असा अर्वाच्च भाषेत बोलणारा कृषीमंत्री कुणी झाला नसेल, असे वैतागलेले अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. सिल्लोडमध्ये शासकीय निधीतून घेतलेल्या कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल बुक …

Read More »

नागपूर हिवाळी अधिवेशन : मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय …

Read More »

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा आल्याने ते रस्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात …

Read More »

२६ लाखांचा अपहार : सरपंचासह ग्रामसेवकाला अटक

धुळे जिल्ह्यातील जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेले सरपंच व ग्रामसेवकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ …

Read More »

उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल : हरपूर प्रकरणात शिंदेना बदनाम करण्याचा डाव, मोहन कारेमोरे यांचे फडणवीस यांना निवेदन

नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) हरपूर येथील एकूण १६ भूखंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. तरीही ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतला होता, असा दावा विरोधकांनी केला. मात्र,जनतेला निव्वळ भ्रमित करण्याचा प्रकार उद्धव ठाकरेकडून सुरु आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी 26 मे 2020 रोजी …

Read More »

रामटेकमध्ये अनेक गावकऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश

रामटेक विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल क्षेत्रात शेखर दुंडे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.हिवरा बाजार, वरघाट, तुमरीटोला, ढुमरीटोला या गट ग्रामपंचायत असलेल्या गावातील असंख्य पुरूष व महिला आणि युवक ग्रामस्थांनी भव्य पक्षप्रवेश करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. हा पक्षप्रवेश तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 👇यांनी केला प्रवेश👇 संजय बाविस्ताले, चिरंजीव …

Read More »

‘या’ भाज्या चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी फ्रीज हा एक वरदान म्ह्णून सिद्ध होतो. पण अनेक असे पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा उलट प्रभाव होऊ शकतो. अनेकदा आठवडाभर कामात व्यस्थ असणारी मंडळी शनिवार- रविवारी आठवड्याची भाजी, फळे आणून ठेवतात. फ्रीजमध्ये अनेकदा आपण अगदी पद्धतशीर या भाज्या लावून ठेवतो. या भाज्या धुवून, स्वच्छ करून अनेकजण चांगलं प्लास्टिकमध्ये कव्हर करून सुद्धा ठेवतात पण तरीही काहीच …

Read More »

नशीब बलवत्तर : महिला ओरडल्या आणि वाघ पळाला

संकट कधी, कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. मात्र,नशीब बलवत्तर असेल, तर संकटाला परतावेच लागते. असेच एक संकट वाघाच्या रूपाने चंद्रपूरात ( दि. २४) एका महिलेवर आले. वाघाने त्या महिलेच्या दिशेने उडी घेतली. मात्र, तिच्‍या जवळ असणार्‍या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघाला धूम ठोकावी लागली. रीना हरीदास जांभूळे असे वाघाच्या हल्यातून बचावलेल्या महिलेचे नाव आहे. घटना कशी घडली? चिमूर तालुक्यातील …

Read More »