केंद्र शासनाकडून जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच विदेशातून शहरात दाखल होणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले. कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी बैठक …
Read More »राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत
चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले. आमदार जयकुमार गोरे यांची …
Read More »30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अभियंता जाळ्यात
सोलर पॅनलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्याच्या कामासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याने 30 हजारांची लाच घेतली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास रंगेहाथ अटक केली. चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बाबूराव विठोबा हंकारे (51) असे अटक केलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. आरोपी बाबूराव हंकारे महावितरणच्या चिंचवड …
Read More »नागरिक त्रस्त : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष कधी होणार स्थापन?
नागरिकांना गावातून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणे सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातील असा कोणताही स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन झालाच नाही. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक -जावक विभागातच नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत, ही बाब समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जानेवारी २०२० रोजी सरकार गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी …
Read More »मंडळ अधिकारी निलंबित
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील गणेशनगरमधील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्याचे निलंबन झाले असले, तरी प्रशासन अवैध उत्खनन करणाऱ्या खडीक्रशरचालकांवर कारवाईस धजावणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मालेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे व जिल्हा गौण खनिज …
Read More »‘पीडब्लूडी’मध्ये चार काेटींचा घाेटाळा ; कारवाई थंडबस्त्यात
रत्नागिरीच्या चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लूडी)लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. मात्र, यात अनेकांना अभय देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. प्रकरण काय आहे? ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन …
Read More »राज ठाकरेंना अनभिज्ञ् ठेवण्याचा ‘प्लॅन’ : दुरुगकरच्या कारनाम्यामुळे मनसेला निवडणुकीत फटका!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात येत आहेत. अनेकांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाने मनसेचा नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची जनमाणसातील प्रतिमा मलीन होत आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणूक असल्याने दुरुगकरच्या खंडणीमुळे मनसेला चांगलाच फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व …
Read More »खंडणीखोर दुरुगकरची हकालपट्टी कधी? : राज ठाकरे उद्या नागपुरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली …
Read More »राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीस विधिमंडळात काय म्हणाले…
देशभरातील कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही राज्य सरकारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशी मागणी पुढे आली. मात्र,अधिवेशनाच्या विधिमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली असून ही योजना लागू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘जुनी पेन्शन योजना लागू …
Read More »नागपूर : कामगार कल्याण मंडळात भ्रष्टाचार, बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कोट्यवधींची लूट
नागपूरच्या सावनेर तालुक्यातील परिसरातल्या 18 बोगस कामगारांच्या नावानं कामगार कल्याण मंडळाने निधी वाटप केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे एका मृत व्यक्तीच्या नावानं तब्बल 2 लाख 34 हजार रुपये लाटण्यात आले. कामगाराला जर या मंडळाशी संबधित कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कामगाराची मंडळाकडे नोंदणी असणं बंधनकारक आहे. मात्र ज्या कामगारांना लाभ देण्यात आले आहेत, त्यातील एकही कामगार नोंदणीकृत नसल्याचं …
Read More »
विश्वभारत News Website