Breaking News

विश्व भारत

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? अजित पवार काय म्हणाले…

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता अजिबात नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई- वडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, या आशयाचे केलेले विधान म्हणजे त्यांची ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार …

Read More »

भूमाफिया सक्रिय : शासकीय जमिनींवर दोन लाख अतिक्रमणे

विश्व भारत ऑनलाईन : राज्य सरकारची चक्क १० हजार ८९ हेक्टर जमीन अतिक्रमणांखाली अडकली आहे. त्यावर तब्बल दोन लाख २२ हजार १५३ बेकायदा बांधकामे असल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटवण्याची कारवाई कशी करणार याचा स्पष्ट आराखडाच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

कलाकारांना मिळेल आर्थिक मदत-सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार

विश्व भारत ऑनलाईन : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. केवळ चित्रिकरणाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना अनेक समस्यांना सामारे जावे लागलं. याच कलाकारांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. या कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. …

Read More »

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पण संधीही द्यावी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोग्य विभागात अकाऊंटिबिलिटीची गरजेची आहे. सरकार बदलले आहे. त्यामुळे अकाऊंटिबिलिटी ठरली पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक आहे. …

Read More »

यवतमाळ-मुंबई बसला आग : नाशिकमधील घटना : चिमकुल्यासह 12 जणांचा बळी

विश्व भारत ऑनलाईन : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस तूरळक पाऊस

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची हजेरी कायम असेल. मोसमी पावसाचा राज्यातील परतीचा प्रवास यंदाही नियोजित सर्वसाधारण वेळेपेक्षा उशिराने होऊ शकतो.दरम्यान, शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबई, ठाणे परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस झाला. शुक्रवारी मुंबई, ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी होती. कोकणात रत्नागिरीसह विविध भागांत, तर मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भातही …

Read More »

निवडणूक आयोगाचे ठाकरेंना पत्र, उद्या दुपारी 2 पर्यंत उत्तर द्या

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे …

Read More »

आमदार, खासदारांची संख्या ठरविणार धनुष्यबाण कुणाचे? शिंदेंचं पारडं जड?

विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण कुणाचा, शिंदे की ठाकरे यावर आजच फैसला अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते. एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप. आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्तवाचं ठरतं. तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या …

Read More »

अभिनेते अरुण बाली यांचे निधन

विश्व भारत ऑनलाईन : चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि आपल्या कामाच्या शैलीने परिचित असणारे अरुण बाली यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी आज पहाटे ४.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी ३ इडियट्स, पीके, केदारनाथ, जमीन और सौगंध सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Read More »

अमरावती-नागपूर-जबलपूर शनिवारपासून धावणार : सणासुदीत १७९ ‘स्पेशल ट्रेन’ची व्यवस्था

विश्व भारत ऑनलाईन : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.जबलपूर-नागपूर-अमरावती ही रेल्वे उद्या शनिवारपासून सुरु होत आहे. तसेच देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. रेल्वे विभागाने सणासुदीनिमित्त या वर्षी छठपूजेपर्यंत १७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या …

Read More »