विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगात धाव घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बाजू मांडण्यास सांगितलं होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी शपथपत्र लिहून घेण्याचा कार्यक्रम रावबला. दुसरीकडे इतर राज्यातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न दोघांकडूनही केले जात आहे. शिंदे-ठाकरेंचे …
Read More »गडचिरोली : नागरिकांनी जाळले तब्ब्ल १० ट्रक… कारण काय?
विश्व भारत ऑनलाईन : सुरजागड डोंगरावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली. ही घटना मंगळवारी (दि.२७) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली. मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात …
Read More »सरकारच्या डोक्यात काय चाललंय? बदल्या होणार किंवा नाही…सर्वच विभागात संभ्रम
विश्व भारत ऑनलाईन : मे आणि जून हा सरकारी बदल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साधारण मार्च महिन्यानंतर जूनपर्यंत राज्यातील सुमारे 40 हजार शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिफारस पत्रे मंत्रालयात येत असतात. आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींकडून संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आग्रह केला जातोय.या शिफारस पत्रांचा ओघ आणि त्याची संख्या पाहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …
Read More »भूसंपादन न करता तयार झाला रस्ता, शेतकऱ्यांची ओरड…. वाचा
विश्व भारत ऑनलाईन : शेताच्या बाजूने रस्ता तयार करायचा असल्यास भूसंपादन प्रक्रिया केली जाते. मात्र, किरकोळ भूसंपादन करून रस्ता तयार केल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. सातारा जिल्ह्याला वेगवान करण्यासाठी अनेक राष्ट्रीय महामार्ग झाले. पुणे- बेंगलोर या 4 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता देखील मिळाली. आता सातारा- लातूर हा महामार्ग रस्ते विकास महामंडळाने गेल्या तीन वर्षात तयार …
Read More »ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.तर,ठाकरेंना धक्का दिला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. आपणच …
Read More »सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : तुमच्या मोबाईलवर बघा…महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद
विश्व भारत ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून …
Read More »नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा
विश्व भारत ऑनलाईन : नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज उपलब्ध निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. …
Read More »तुमचा 7/12 बघितलाय का? मोठा बदल… जाणून घ्या आजच
विश्व भारत ऑनलाईन : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 7/12 उताऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक 7/12 उताऱ्याला वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. तर, वरच्या बाजूला बारकोड असणार आहे. फसवेगिरी थांबणार यातून 7/12 उताऱ्यावर होणारी हेराफेरी, खाडाखोड, फसवेगिरी थांबणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच एका शेतकऱ्याची नेमकी कुठे किती शेतजमीन आहे, याची माहिती याद्वारे मिळण्यास मदत होईल. …
Read More »सत्तार, गुलाबराव पाटील यांनी केल्या 3 रेल्वे,300 बसेस बुक… काय आहे कारण?
विश्व भारत ऑनलाईन : आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटत चालले आहे. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांना जास्तीत जास्त ‘गर्दी’ जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एकट्या अब्दुल सत्तार यांच्याकडून 300 एसटी बुक करण्यात आल्या आहेत. पाच ऑक्टोंबरला सर्व बसेस …
Read More »फडणवीस-जितेंद्र आव्हाड भेट, चंद्रशेखर बावनकुळेचे सूचक विधान
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत.राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आव्हाड काय म्हणाले? मतदारसंघातील …
Read More »
विश्वभारत News Website