Breaking News

प्रशासन

300 एकर जमिनीची परस्पर विक्री, आरएफओ-वनपाल निलंबित

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 300 एकर शेतजमिनीचा परस्पर सौदा वनविभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल यांना नाशिक उपवनसंरक्षक वावरे यांनी निलंबित केले आहे.तसेच सखोल चौकशी करण्याची विनंती जिल्हाधिकारी नाशिक यांना वनविभागाने केली आहे. नांदगाव तालुक्यातील भादुरी वनपरी मंडळातील मौजे डॉक्टरवाडी येथील 300 एकर जमीन (119 हेक्टर) आहे.

Read More »

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

राज्यातील समुदाय आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे 10 हजार आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. विविध जिल्ह्यातही आरोग्य अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंदचा इशारा संघटनेने दिलाय. सोबतच बंधपात्रित अधिपरिचारिका यांनीही मागण्याकडे लक्ष वेधले होते. आंदोलन का? गेल्या सहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील समुदाय आरोग्य अधिकारी उत्तमरित्या सेवा प्रदान करीत आहेत. …

Read More »

‘महसुल’ची मनमानी,नागरिक वेठीस : खरेदी दस्त नोंदीसाठी‎ तुकडाबंदीच्या नावाखाली टाळाटाळ‎

बिनशेती प्लॉटची(NA) तुकडा बंदीच्या नावाखाली नोंदी‎ करण्यास महसूल विभागाकडून‎ टाळाटाळ केली जाते. या‎ मनमानीमुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील‎ अनेक खरेदी दस्तांच्या‎ नोंदी महसूल प्रशासन करीत‎ नसल्याची स्थिती आहे.‎ परवानगीच्या नावाखाली संबंधित‎ अधिकारी नागरिकांना वेठीस धरत आहेत, अशी तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल‎ यांच्याकडे केली आहे.‎ जिल्ह्यात सर्वत्र बिनशेती‎ प्लॉटची खरेदी-विक्री होऊन त्याची‎ महसूल विभागाकडे नोंदणी होत‎ आहे. मात्र, असे असूनही फैजपूर‎ …

Read More »

‘जुनी पेन्शन’चा निर्णय विचारपूर्वक घेणार : फडणवीस

शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दहा वर्षांत अडीच लाख कोटींवर हा खर्च जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबाग येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, निवडणूक …

Read More »

गडचिरोलीतही शिक्षक भरती घोटाळ्याची पाळेमुळे : चौकशी थंडबस्त्यात

राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीवर बंदी आहे. त्यानंतरही काही शिक्षण अधिकाऱ्यांनी बनावट मान्यतेवर अनेक शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीची परवानगी दिली होती. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबई ते गडचिरोलीपर्यंत असून वरिष्ठांच्या आशीर्वादाने विभागीय चौकशी थंडबस्त्यात ठेवल्याचे चित्र आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नवीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

बायको बोलत नाही, सुट्टीसाठी पोलिसाचा अर्ज!

एका पोलिसाच महिन्याभरापूर्वी लग्न झालं.लग्नानंतर लगेच तो बायकोला सोडून ड्यूटीवर परतला. त्याने त्याच्या बायकोला वचन दिलं की तो लवकरच सुट्टी घेऊन घरी येईल. मात्र, त्याला सुट्टी मिळत नाहीये. सुट्टी मिळत नसल्याने बायको नाराज झाली. आणि ती माझ्याशी नीट बोलत नाही, असं त्याने पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगितले. बायको बोलेना ‘वारंवार कॉल करतोय पण ती फोन उचलेना आणि फोन उचलला की काहीही …

Read More »

पोलीस भरतीतील उमेदवारांकडे सापडली औषधी द्रव्ये

पोलिस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे रायगडमध्ये औषधी द्रव्य सापडल्याने खळबळ उडाली. यातीच एका उमेदवाराची मैदानी चाचणी शनिवारी झाली. तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र, त्याची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या उमेदवाराचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीकता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोणती औषधे? …

Read More »

वर्ग-2 चा मुद्दा : महसूल अधिकाऱ्यांनी केला कोटींचा घोळ

बारामतीत महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी न घेता त्रयस्थ अर्जदाराच्या नावावर नवीन शर्तीची वर्ग-2 ची जमीन वर्ग केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात शासनाचा 3 कोटी 44 लाख रुपयांचा महसूल संगनमताने बुडविण्यात आला, अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. याप्रकरणी धवडे याजिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे बुद्रुक येथील गट क्रमांक 94/2 मधील मूळची वन विभागाची …

Read More »

राज्यात 50 गावांमध्ये भूकंपाचा धक्का; भीतीने नागरिक घराबाहेर

हिंगोली जिल्हयातील वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील सुमारे 40 ते 50 गावांमध्ये आज,रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. पहाटे साडेचार वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.तसेच नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फेही या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे. कुठे बसलाय धक्का… वसमत, कळणनुरी व …

Read More »

भ्रष्ट अभियंता गोडसेंना वाचविण्यासाठी केंद्रेकरांची ‘फिल्डिंग’!

औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात बनावट वृक्षारोपण घोटाळा उघडकीस आलेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी …

Read More »