वर्धा प्रतिनिधी :- पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 06.11.2020 रोजी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे दिनेश बुधुलाल कैथवास वय 40 वर्षे रा . सावरकर लेआउट , दयाल नगर , वर्धा यांनी रिपोर्ट दिला की दिनांक 04.11.2020 चे सकाळी 07.00 वा . दरम्यान घराला कुलुप लावुन रोज मजुरीचे कामाला गेला असता व कामावरून सायंकाळी 07.00 वा परत घरी आला असता …
Read More »मानव पृथ्वीचा मालक नव्हे तर सेवक – विवेक भीमनवार : बहारच्या पक्षीसूची प्रकाशनाने पक्षीसप्ताहाची सुरुवात – वनविभागाचा सहभाग
वर्धा – मानवाने आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना न जोपासता पर्यावरणातील वन्यजीव, पशू, पक्षी, कीटक, वनस्पती आणि निसर्गातील सर्व घटकांसोबत सहजीवनाचा विचार केला तरच पृथ्वीचे अस्तित्व आल्हाददायक राहील. स्वतःला पृथ्वीचा मालक न समजता सेवक समजले तर पर्यावरण टिकून राहील, असे उद्गार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पक्षीसप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले. या कार्यक्रमात बहार नेचर फाउंडेशनद्वारे संपादित करण्यात आलेल्या जिल्हा पक्षी सूचीचे प्रकाशन भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी …
Read More »पक्षीसप्ताहात बहारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन* जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा पक्षीसूचीचे प्रकाशन
वर्धा जिल्हा प्रतिनिधी – दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पक्षीसप्ताह साजरा केला जाणार असून जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे व वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ गुरुवार, दि. ५ रोजी जिल्हा पक्षी सूची प्रकाशनाने होणार असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या …
Read More »एस. टी. कामगार संघटनाचा आवाज अधिवेशनात उचलनार – आमदार दादाराव केचे
वर्धा : आर्वी :- महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना आर्वी विभाग आणि तळेगाव विभाग यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार दादाराव केचे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देऊन कोरोना काळात जिव मुठीत घेऊन अत्यावश्यक सेवा बजावली असतांनाही एस. टी. कामगारांना वेतन मिळाले नाही याबाबत अवगत केले. यावर आमदार दादाराव केचे यांनी हा प्रश्न अधिवेशनात उचलून धरुन झोपी गेलेला सरकारला जागे करून एस. टी. कामगारांचा …
Read More »जनक्रांती सेना व माँ शारदा पूजा उत्सव समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जनक्रांती सेना वर्धा जिल्हा व माँ शारदा पूजा उत्सव समिती च्या वतीने माता शारदा देवीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून विसर्जनाला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.पोलिस कॉटर एरीकेशन कॉलनी ते पिपरी मेघे येथून आर्वी नाका येथील फुटपाथवरील व्यवसायिकांना मास्क व sanitizer चे वाटप करण्यात आले. जनक्रांती सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुशांतभाऊ खडसे यांनी …
Read More »लोकप्रतिनीधींनी प्रामाणिकपणे काम केल्यास गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस
वर्धा : देवळी:- जनतेने आपल्याला गावाच्या विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. ज्या पदावर आपण विराजमान होतो. त्या पदाचे अधिकार, कर्तव्ये, नियम समजून घेतले पाहिजेत. गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम गावाच्या गरजांचा अभ्यास करा. ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभाथ्र्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणा–या कर्मचा–यांची गावाच्या विकासाप्रती मानसिकता असणे महत्वाचे आहे, आपण प्रामाणिकपणे काम केले तर सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो, सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. माजी सभापती व जि.प.सदस्य मुकेश भिसे यांच्या प्रयत्नातुन इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल,चोंदी, शिरपूर (होरे) येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प.उपाध्यक्षा सौ. वैशाली ज. येरावार, समाजकल्याण सभापती विजयराव आगलावे, जि.प.सदस्य व माजी सभापती मुकेश भिसे, उपसभापती प.स. युवराज खडतकर, जि.प.सदस्य सुनिताताई राऊत,प.सदस्य शंकरराव उईके, जयंत येरावार, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, गजानन राऊत, इसापूरच्या सरपंच सौ. प्रणिता आबंटकर, उपसरपंचत करपते, बाबुळगांव खोसेचे सरपंच अमोल आ़त्राम, उपसरंपच गुणवंत चांदेकर, भिडीचे सरपंच सचिन बिरे, उपसरपंच अतुल क्षेत्री, विजयगोपालचे सरपंच व उपसरपंच, चोंदीचे सरपंच संतोशराव मसराम, उपसरंपच दिनेश लोहे, शिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकर, उपसरपंच सौ. राधाबाई लडके, मुरदगाव खोसेचे सरपंज गजानन हिवरकर, लोणी सरपंच वैभव श्यामकुवर, वासुदेवरा वाकुडे व इसापूर, बाबुळगांव खोसे, हुसनापूर, विजयगोपाल, चोंदी, शिरपूर (होरे) ग्रामपंचायतचे सर्व सचिव, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Read More »आमदार दादाराव केचे धावून आले देवासे कुटुंबीयांच्या मदतीला
कारंजा तालुक्यातील मोर्शी गावातील शिवाजीराव देवासे यांच्या राहत्या घराला ३१ अॉक्टोबर २०२० ला घरात कोणी नसतांना अचानक आग लागल्याचे आमदार दादाराव केचे यांना कळता क्षणी कारंजा तालुक्याचे तहसीलदार कुमावत यांना दुरध्वनीने संपर्क करून वस्तुस्थितीची पाहणी करून मोका पंचनामा करण्यास सांगितले होते. दिनांक १ नोव्हेंबर २०२० ला स्वतः आमदार दादाराव केचे यांनी देवासे यांच्या घराची तहसीलदार कुमावत यांच्यासह मोका पाहणी केली. …
Read More »भादोड भाईपूर पुनर्वसित गावामध्ये विभागांचा प्रताप – आधी केले रस्त्यांचे डांबरीकरण, त्यावर मजीप्रा चालवत आहेत जेसीबी
हा तर शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय – निखिल कडू अध्यक्ष निम्म वर्धा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आर्वी :- निम्म वर्धा प्रकल्पा अंतर्गत बाधीत गावातील १८ नागरी सुविधांची देखभाल दुरुस्ती करीता मिळालेल्या ३५ कोटी रूपयांतून पुनर्वसित गावांचे चहरे पालटण्याची आशा होती. यासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला, पाणीपुरवठाची कामे मजीप्राला, विद्युत रोषणाई व दुरुस्तीचे काम महावितरणला, इतर कामे जिल्हा परिषद वर्धाला …
Read More »2024 पर्यंत जलजिवन मिशन प्रत्येक घरात पाईपलाईनव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचा केन्द्रसरकारचा मानस, खासदार रामदास तडस
देवळी: जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळायला हवे. चांगल्या आरोग्याची हमी देणे ही शासनाचे आद्य कर्तव्य आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळते, मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाण्याचाच पिण्यासाठी वापर करावा लागतो. त्यामुळे गावागावांत शुद्ध पाणी मिळावे, वाढते प्रदूषण आणि फ्लोराइडमुळे पिण्याचे पाणी अनेकांच्या जीवावर उठत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे, यासाठी एटीएम व्दारा शुद्ध …
Read More »पुलगांव येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील बाहयवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खासदार रामदास तडस यांचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाला निर्देष
पुलगांव येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील बाहयवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, खासदार रामदास तडस यांचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाला निर्देष वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्र 753 सी अंतर्गत येत असलेला पुलगांव शहरातील रेल्वे गेट ते पुलगांव बाहयवळण रस्ता संपुर्ण पणे क्षतीग्रस्त झाला असल्याने दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत तसेच वर्धा जिल्हयातुन अमरावती तसेच वाशिम, बुलढाणा व जालना या …
Read More »
विश्वभारत News Website