विश्व भारत ऑनलाईन : अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व चलनी नोटावरून महात्मा गांधीजीं ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा, अशी मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला दिलेले योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कार्याशी तुलना करता कमी नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे. याला अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही दुजोरा दिला आहे. सुभाषचंद्र बोस …
Read More »जिल्हा परिषद पदभरती रद्द :१३ हजार पदांची प्रक्रिया रखडली
विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध …
Read More »सलमान खानला डेंग्यूची लागण, कोण सांभाळणार ‘बिग बॉस’ शो?
विश्व भारत ऑनलाईन : बॉलिवूडचा दबंग सलमान खानला डेंग्यू झालाय. सलमान खान मागील दोन आठवड्यांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. तेव्हा त्याला डेंग्यूची लागण झाली. डेंग्यूची लागण झाल्यामुळे सलमान ‘वीकेंड का वार’ही होस्ट करणार नाही. सलमान खानची प्रकृती मागील चार-पाच दिवसांपासून खराब आहे. डेंग्यूमुळे त्याने चित्रपट आणि शोचे शूटिंग बंद केले. टीव्हीचा लोकप्रिय रिॲलिटी शो …
Read More »निरोगी आयुष्य पाहिजे : तर असे करा भगवान ‘धन्वंतरी’चे पूजन
विश्व भारत ऑनलाईन : आरोग्य हेच सर्वकाही आहे. आरोग्यम् धनसंपदा असे आपण म्हणतो आणि ऐकतो. उत्तम आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे, असा याचा अर्थ होतोय. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते. भगवान धन्वंतरींना आद्य वैद्य मानले जाते. किंवा आजच्या भाषेत भगवान धन्वंतरी हे या जगातील पहिले डॉक्टर होय. त्यांनाच आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाते. काय …
Read More »दिवाळी, आज वसुबारस : कृषक संस्कृतीचे महत्त्व सांगणारा पारंपरिक सण
विश्व भारत ऑनलाईन : दिवाळसणाची आज वसुबारसने सुरुवात झाली. दिवाळीचा आज पहिला दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत गाईचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे. गायींचा सांभाळ जवळपास सगळ्याच गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, …
Read More »शिंदे गटातील मंत्री बेपत्ता, राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार
विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्यात आलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना गुलाबराव पाटील गायब झाल्याचे म्हटले आहे. जनतेने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
Read More »स्वप्न नव्हे सत्य : ‘तो’ पत्नीला घेऊन जाणार चंद्रावर
विश्व भारत ऑनलाईन : निवडणुकीवेळी राजकीय मंडळींकडून दिली जाणारी आश्वासने आणि प्रेयसीसमोर भावूक होऊन प्रियकराने दिलेली वचने यामध्ये फरक नसतो! निवडणुकीनंतर पाच वर्षे आणि लग्नानंतरची आयुष्यभराची संसाराची वर्षे त्याला साक्ष असतात. ‘तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणेन, तुला चंद्रावर नेईन’… असे एक ना दोन, प्रेमात अशी कितीतरी वचने दिली जातात. स्वप्नही दाखवली जातात. प्रत्यक्षात ही स्वप्नं साकार करणे काही शक्य …
Read More »नागपुरातील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला सांस्कृतिक मंत्रालयाकडून पुरस्कार
विश्व भारत ऑनलाईन : महाराष्ट्र शासननाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2022 चे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव पुरस्कार अलीकडेच देण्यात आले. यात नागपुरातील सदर, किराडपुरा येथील विजय बाल गणेश उत्सव मंडळाला उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर आयोजित करण्यात आला होता. यात 33 जिल्हास्तरीय आणि तीन राज्यस्तरीय मंडळाला पुरस्कार देण्यात आले. त्यात नागपुरातील विजय बाल गणेश …
Read More »२४ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील तब्बल २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला …
Read More »मोबाईल खरेदीसाठी ‘ती’ रक्त द्यायला तयार : अल्पवयीन मुलगी पोचली थेट ब्लड बँकेत
विश्व भारत ऑनलाईन : मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता मोबाईल फोनही गरजेची वस्तू बनला आहे. अनेक दैनंदिन कामे मोबाईलच्या माध्यमातून करीत असतो. हातात महागडा स्मार्टफोन आजकाल स्टेट्स आहे. अगदी शाळकरी मुलेही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. मोबाईल मिळवण्यासाठी मुले कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे. मुलगी पोहोचली …
Read More »
विश्वभारत News Website