Breaking News

विश्व भारत

तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन

विश्व भारत ऑनलाईन : जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं …

Read More »

केंद्रीय मंत्री दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव शिंदेसेनेत? वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसशी नाते सांगत होते. मग त्यांनी शिवसेना, मनसेची साथ घेतली.आता त्यांची शिंदेसेनेशी जवळीक वाढल्याचे दिसते.उद्योगमंत्री उदय सामंत यांना ते मुंबईत जाऊन भेटल्याने कन्नड तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्यांचे समर्थक जाधव यांनी शिंदेसेनेत जावे, असे म्हणत असले तरी भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि जाधव यांच्यामधील द्वेष लक्षात घेता असा …

Read More »

एक-दोन गुंठे जमिनींची दस्त नोंदणी नाहीच : हायकोर्टाची तूर्तास स्थगिती

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनींचे तुकडे पाडून दस्त नोंदणी होत होती. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर जमिनींचे तुकडे पाडून खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करायची असल्यास संबंधित क्षेत्राचे रेखांकन (ले-आऊट) करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने ही बंदी उठवली. त्यानंतर पुन्हा पुर्नविचार …

Read More »

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पाकिस्तानचे ?समाजमाध्यमांवर दावा

विश्व भारत ऑनलाईन : ऋषी सुनक यांच्या ब्रिटन पंतप्रधान निवडीत भारताची कोणतीही भूमिका नसतानाही ते भारतीय वंशाचे असल्याचा भारतीयांना अभिमान वाटत आहे. मात्र, पाकिस्तानचे नागरिकही यात सहभागी झाले आहेत. सुनक मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सुनक यांच्या पैतृक घराण्यातील त्यांचे आजी-आजोबा ब्रिटिशकालीन भारतात जन्मले होते. त्यांचे जन्मस्थळ सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील …

Read More »

आता एक रुपयात खरेदी करा सोने…पण कसे?

  विश्व भारत ऑनलाईन : डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता. डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. …

Read More »

आनंदोत्सवाची पेरणी : वनगाव-पोहरीच्या शेतकऱ्यांनी केले प्रकल्पाचे जलपूजन

विश्व भारत ऑनलाईन : दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करून उदरनिर्वाह करायचा. आपल्याला निसर्गाने भरघोस दिलंय, याचीही प्रचिती तेथील शेतकऱ्यांना नव्हती. तरीही, मनात जिद्द बाळगून परिसरातील ७०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणून ५ गावांमधील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न शेतकऱ्यांनीच सोडविला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जलपूजनही केले. दिवाळीचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वनगाव-पोहरी येथील शेतकऱ्यांनी ही किमया साधली. वनगाव पोहरीचे सरपंच एकनाथ …

Read More »

शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण

विश्व भारत ऑनलाईन : राजकारणात काहीही शक्य आहे. एकमेकांचे वैरी कधी एकत्र येतील, याचा नेम नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर ‘रोखठोक’मधून हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना …

Read More »

मुलीला ‘आयटम’ म्हटलं, कोर्टाने सुनावली तरुणाला शिक्षा

विश्व भारत ऑनलाईन : मुलींना कधी-कधी रोड रोमिंयोंचा त्रास होतो. तर, कधी मुली अशा घटनांचकडे कानाडोळा करतात. एखादा मुलीने यावर तक्रार केल्यास शिक्षा होऊ शकते. हे या प्रकरणावरून लक्षात येईल. घटना अशी… एका १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ संबोधणं एका २५ वर्षीय व्यावसायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी पोक्सो न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. आरोपीनं पीडितेचे केस ओढून …

Read More »

“उद्धव ठाकरेंना घरात करमेना,जवळ बसायला लोकं नाहीत, म्हणून आठवले शेतकरी… “

विश्व भारत ऑनलाईन : मातोश्रीचा उंबरा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली, तेव्हा त्यांनी काडीची मदत केली नाही. पुरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले, तेंव्हा त्यांना आधार दिला नाही. आता निवांत वेळ आहे. सगळी आमदार मातोश्रीवरून निघून गेली आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. बसायला लोक कोणीच येत …

Read More »

सोमवारी सायंकाळी 5 नंतरच लक्ष्मीपूजन : कुबेर आले श्रीकृष्णासाठी धन घेऊन

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीचा महत्वाचा दिवस अर्थात लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही. सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल. अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त फक्त संध्याकाळ आणि रात्रीच असेल. 2000 वर्षांनंतर दिवाळीला बुध, गुरू, शुक्र आणि शनि आपापल्या राशीत राहतील. तसेच लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »