Breaking News

विश्व भारत

आमदार अस्वस्थ : मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास सरकार कोसळणार?

विश्व भारत ऑनलाईन : शिंदे गटाचे दिपक केसरकर हे अजून दोन वर्ष शिक्षण मंत्री राहतील, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पाटील यांनी हे विधान करून राज्यातील शिंदे सरकार दोन वर्ष टिकणार असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत वेगळीच भविष्यवाणी केली आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी …

Read More »

जमलं नाही तर कुस्ती…दानवेंचे अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच …

Read More »

जिल्हाधिकारी करतात कर्मचाऱ्यांचा अपमान, मंत्र्यांची मध्यस्थी

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला. विशेष म्हणजे २० ते २५ कर्मचाऱ्यांनी फक्त तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, लेखी निवेदन दिलेले नाही. गुरुवारी विमानतळावर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वागताला प्रोटोकॉलननुसार जे अधिकारी हजर नव्हते त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्या. …

Read More »

संत्रापेटीत ड्रग्ज,नवी मुंबईत कारवाई

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी नवी मुंबईत मोठी कारवाई केली. डीआरआयने शनिवारी १९८ किलो ‘हाय प्युरिटी’ क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1,476 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ‘हाय प्युरिटी’ कोकेन जप्त केले. हे ड्रग्ज संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करीसाठी आणण्यात आले होते. याप्रकरणी डीआरआयने आयातदाराला अटक केली आहे. तसेच रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या वित्तसंस्थेसह कस्टम हाउस एजंट आणि …

Read More »

‘पीयूसी’ नसल्यास पेट्रोल – डिझेल मिळणार नाही… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : सर्वच शहरात प्रदुषणाचे वाढते संकट गंभीर समस्या आहे. दिल्ली आघाडीवर आहे. वाहनांच्या धुरामुळे सर्वात जास्त प्रदुषण झालेले पहायला मिळत आहे. हे प्रदुषण कमी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी एक महत्त्वाचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. 25 ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपांवर पीयूसी प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाणार नाही, अशी घोषणा दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी …

Read More »

भाजपमध्ये शिक्षक आमदारकीसाठी नागपुरातून कोणती नावे चर्चेत?

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कधी काळी नितीन गडकरी यांनी नेतृत्व केलेला पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड होता. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने अभिजित वंजारी यांना उभे करुन भाजपच्या गडावर कब्जा केला होता. आता शिक्षक आमदार निवडणुकीची घंटी वाजली आहे. त्यासाठी सुमारे अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपची मोठी डोकेदुखी …

Read More »

7/12 वर नोंदवा विहीर, झाडे ‘ई-पीक’अँपद्वारे

विश्व भारत ऑनलाईन : आता शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल लावण्यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे खाण्याची आवश्यकता नाही. शासनस्तरावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. पीक विमा योजना, नुकसानभरपाई पंचनामा, शासकीय मदत किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्त्वाचे ठरत आहे. याचसोबत आता या ॲपमध्ये शेतकरी आपल्या शेतातील विहीर, बोअरवेल, झाडांचीही नोंद करू शकेल. ई-पीक पाहणी …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा गांधी घराण्याला इशारा

विश्व भारत ऑनलाईन : पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीवरून गांधी घराण्याला इशारा दिलाय. चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे. राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात …

Read More »

पोलिसांचे वेतन दीडपट वाढणार… वाचा सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडचिरोलीतील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात …

Read More »