Breaking News

विश्व भारत

मासेमारीला गेलेल्या व्यक्तीचा तलावात मृत्यू

चंद्रपूर : सावली तालुक्यातील केरोडा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापू राऊत (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. केरोडा येथील सुखदेव राऊत हे तीस वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोसायटीच्या वतीने केरोडा गावातीलच तलावात मासेमारी करण्यात आली. संस्थेतंर्गत असलेल्या काही गावातील मत्स्य व्यवसायिक केरोडा …

Read More »

नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील

राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …

Read More »

शिंदे सरकार कोसळणार?राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली असली तरी यातून शिंदे सरकार कोसळणार की पायउतार होणार? हा चर्चेचा विषय आहे. याबाबत घटनातज्ज्ञ काय म्हणतात… वाचा “पक्षांतर बंदी कायद्यानुसार सुरुवातीला बाहेर पडणारे १६ आमदार दोन-तृतीयांश आमदार नाहीत. पण त्यानंतर एक-एक करत अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी दोन तृतीयांशसाठी आवश्यक असणारा ३७ चा मॅजिक आकडा गाठला. …

Read More »

चंद्रपूर : पीडब्लूडीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदेला 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार यांनी सदर पुल बांधणीचे कामे पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन …

Read More »

कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असतानाच निघाला किंग कोब्रा

आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक …

Read More »

यवतमाळ : कारचा टायर फुटला, प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू

यवतमाळच्या प्रसिद्ध महिला डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. पियूष बरलोटाही होते. या दोघांचाही अपघाती मृत्यू झाला आहे. डॉ. सुरेखा बरलोटा या यवतमाळच्या प्रसिद्ध स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यात सुरेखा बरलोटा आणि डॉ. पियूष बरलोटा या दोघांचा मृत्यू झाला. कशी घडली घटना? डॉ. पियूष बरलोटा आणि …

Read More »

प्रकल्प बाहेर जाण्यास ठाकरेच जबाबदार : टक्केवारीमुळे उद्योजक होते नाराज

उद्धव ठाकरेंच्या काळातच महाराष्ट्रातून उद्योग प्रकल्प बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु झाली नसून ठाकरेंनाच उद्योग राज्यात ठेवण्यास उत्सुकता नव्हती, असा आरोप भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी केलाय. टक्केवारी मागीतल्यानेच उद्योग बाहेर गेले, असा आरोप ठाकरेंवर केला जातोय. आता पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 297 एकरवर होऊ घातलेला रांजणगावचा क्लस्टर म्हणजे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक इको-सिस्टीमच्या विस्ताराची सुरुवात आहे, असे उद्गार …

Read More »

परफ्यूमपेक्षाही उत्तम : आंघोळ करताना करा ‘या’ गोष्टींचा वापर

मानसिक स्वच्छतेबरोबरच शारीरिक स्वच्छता आवश्यक आहे. आंघोळ नियमित केल्याने शरीर स्वच्छ आणि ताजे राहते. तसेच आजार दूर राहतात. मात्र, काही वेळा आंघोळ केल्यानंतरही फ्रेश वाटत नाही. त्यामुळे आंघोळ केल्यानंतरही काहींच्या अंगातून दुर्गंधी येते. फ्रेश वाटावं यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळव्यात हे सांगणार आहोत, तुम्हाला साहजिकच दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि परफ्युमची गरजही संपेल. …

Read More »

LPG सिलेंडर झाले स्वस्त : पण…

नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेला महागाईसंदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. मात्र 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. नवीन दर काय? – मुंबईत पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत …

Read More »

तर बुधवारी राजीनामा देणार : अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादचे माजी खासदार ​​​​चंद्रकांत खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. याचा अर्थ जर मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी प्रसारमाध्यमांत माझ्या राजीनाम्याची ब्रेकींग न्यूज येईल. त्यानंतर मैदानात त्यांनी यावे. कोण गदा घेऊन येतो, कशा पद्धतीने येतो, त्याला आमची ढाल-तलवार कशा पद्धतीने लढा देईल हे सर्वांना दिसेल, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते …

Read More »